Site icon Jan Bharat Samachar

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत ८०% करपश्चात नफा मिळवला आणि बाजारपेठेतील आपला वाटा वाढवला

Spread the love

पुणे, – द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (एनआयएसीएल), बाजार हिस्सा पाहता भारतातील सर्वात मोठी असलेल्या सामान्य विमा कंपनी, ने ३० जून २०२५ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

सुश्री गिरीजा सुब्रमण्यम, अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक , द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी निकालांवर भाष्य करताना म्हणाल्या, “तुम्हाला कळवताना मला खूप आनंद होत आहे की NIACL ने ₹१३,३३४ कोटींचा एकूण लेखी प्रीमियम मिळवला आहे, जो आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत १३.११% ची वार्षिक वाढ दर्शवितो. या कालावधीत NIACL च्या देशांतर्गत सकल थेट प्रीमियममध्ये १५.२७% वाढ झाली तर उद्योगाच्या देशांतर्गत सकल थेट प्रीमियममध्ये ८.८४% वाढ झाली. परिणामी, या कालावधीत आमचा बाजार हिस्सा १४.६५% वरून १५.५१% पर्यंत वाढला. मोटर एलओबीमध्ये कमी वाढ असूनही NIACL च्या देशांतर्गत व्यवसायात उत्तम वाढ दिसून अली आहे, कारण आम्ही सध्याच्या स्पर्धात्मक तीव्रतेचा विचार करून अधिक सावधगिरी बाळगली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ११६.१६% वर एकत्रित गुणोत्तर स्थिर होते. अग्निशमन, अभियांत्रिकी आणि आरोग्य पोर्टफोलिओमध्ये उत्तम वाढ नोंदवली गेली.

एअर इंडियाच्या विमानातील दुर्दैवी घटनेचा अंडररायटिंग निकालांवर विपरीत परिणाम झाला. आरोग्य विभागात तोटा प्रमाण किंचित जास्त दिसून आले आणि काही मोठ्या तोट्यांचा परिणाम दायित्व आणि विविध पोर्टफोलिओवरही झाला. याव्यतिरिक्त, काही लीगेसी नॉन-मूव्हिंग बॅलन्ससाठी तरतुदी करण्यात आल्या ज्या चांगल्या गुंतवणूक उत्पन्नाद्वारे ऑफसेट केल्या गेल्या.

करपश्चात नफा ८०% वाढून ₹३९१ कोटी झाला. आमची बॅलन्स शीट मजबूत राहिली आहे, व्यवस्थापनाखालील मालमत्ता ₹१,००,८०२ कोटी आणि नेट वर्थ ₹४५,४१४ कोटी आहे. सॉल्व्हन्सी रेशो १.८७x वर स्थिर होता.

Exit mobile version