आलंदीधर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

माऊलींचे पालखी सोहळ्याचे गुरुवारी रात्री उशिरा प्रस्थान

संपदा सोहळा नावडे मनाला ! लागला टकळा पंढरीचा !! अलंकापुरीत दिंड्या दिंड्यातून वारकरी पालखी सोहळ्यास दाखल

Spread the love

आळंदीत भाविक, वारकरी नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वारी म्हटले की प्रत्येक वारकऱ्याला आपल्या लाडक्या विठूरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते. यासाठी पायी वारी करत कधी एक वेळ पंढरपूरला पोहोचून भगवान पांडुरंगाचे दर्शन घेईल अशी वारकर्यां चे मनात ओढ असते. भगवान पांडुरंग सुद्धा आपल्या भक्ताच्या भेटीची उभा राहून वाट पाहत असतो अशी लाखो वारकरी भाविकांची भावना आहे. यावर्षी श्रींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह आळंदी मंदिरातून गुरुवारी ( दि. १९ ) पंढरीचे दिशेने हरिनाम गजरात मार्गस्थ होण्यास प्रस्थान ठेवणार आहे. राज्य परिसरातून वारकरी, भाविक आपापल्या लवाजम्यासह दिंड्या दिंड्यांतून आळंदीत हरिनामाचा गजर करीत दाखल झाले आहेत. यावर्षी राज्यात पुन्हा कोरोंना महामारीचे सावट डोके वर काढीत असताना कोरोना रुग्नांची संख्या घातल्याने सावट टळले आहे. तरी हि प्रशासनाने भाविक,वारकरी यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत आषाढी यात्रेचे नियोजन व्यवस्थित केले आहे.

राज्यात अलीकडे कोरोना रुग्ण संख्या घटत असताना दिसत आहे. यावर्षी पायी वारी सोहळ्यात भाविकांची संख्या वाढणार असल्याने याची दखल घेत प्रशासनाने नियोजन सतर्क राहून केले आहे. वारकरी, भाविकांत समाधानाचे, आनंदाचे वातावरण आहे. आषाढी पायी वारी पालखी सोहळा अंतर्गत आनंद सोहळा साजरा करण्यास अलंकापुरीत लाखो भाविक हरिनामाचा गजर करीत दाखल झाले आहेत.

आळंदी नगरपरिषद प्रशासनाने पुणे जिल्हा महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सोहळ्याचे नियोजनात भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत वारीची तयारी केली आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे. वारीचे पार्शवभूमीवर वारकरी साधकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये आनंद सोहळ्यात सहभागी होत असल्याचे सांगितले.

आळंदीत बुधवारी ( दि. १८ ) श्रींचे अश्वांचे आगमन होत असून राज्यातील भाविक हरिनाम गजरात दाखल होत आहे. आळंदीत हरिनामाचा गजरात कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताहात हरिजागर सुरु झाला आहे. गुरुवारी ( दि. १९ ) माऊली मंदिरातून श्रींची पालखी सोहळ्यासह पंढरीला जाण्यास रात्री उशिरा प्रस्थान ठेवणार आहे.

वाट पाहे उभा भेटीची आवडी ! कृपाळू तातडी उतावीळ !! अशा प्रकारे देवाचे आणि भक्ताचे प्रेमाचे नाते आहे, म्हणून पायी वारी व्हावी अशी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वारकरी भाविकांची इच्छा असते. भाविक, वारकरी यांना पायी वारी सोहळा अनुभवता येणार आहे. दक्षता घेऊन वारीत नियोजन केले जात आहे. राज्यातील वारकरी भाविकांनीही स्वतः सह इतरांची काळजी घेऊन वारीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री जोग महाराज प्रासादिक दिंडी क्र ६९ अध्यक्ष ह भ प गजानन महाराज लाहुडकर यांनी केले आहे.

यावर्षी वारी विषयी शासनाने जाहीर केलेला निर्णय हा आनंददायी आहे. यामुळे वारकरी संप्रदाय हा पायी वारी व्हावी या मताचा आहे. आपल्या परंपरेने अथ निती नियमांमुळे जनसामान्यांना त्रास होऊ नये हीच वारकरी संप्रदायाची भूमिका राहिलेली आहे. वारी म्हणजे शास्त्राने सांगितलेला अभिगमन नावाचा विधी आहे. आणि हा विधी पायी वारीनेच पूर्ण होत आहे. यामुळे सांप्रदायिक वारकरी लोकांना निश्चितच आनंद झाला आहे. संप्रदायदायाचे निश्चितच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा डॉ यशोधन किसन महाराज साखरे यांनी व्यक्त केली.

वारी ही वारकऱ्याच्या साधनारत जिवनातील अविभाज्य घटक आहे. वारी ही एक सर्वांगानी परिपूर्ण साधना आहे. वारीचे महत्व संतानी फारच विशेषत्वाने विषद केलेल आहे . याच जन्मी नव्हे ? तर! वारी करणे साठी पून्ह: पून्ह : जन्म घेऊ गर्भवासाचे गाढे दुःखही सहन करू परंतु ? वारी करु ! भजन संपवितांना उपसंहारात्मक अभंगाद्वारे मागणे ते एक तुज प्रति आहे | देशील तरी पाहे पांडूरंगा I या संतासी निरवी हे चि मज देई | आणिक दुजे काही न मागो देवा | तुका म्हणे आता उदार तु होई मज ठेवि पायी संता चिया |… हे चि व्हावी माझी आस I जन्मोजन्मी तुझा दास | पंढरिचा वास करी वारी चुको नेदी हरी I यातून वारी बद्दलची असणारी अविट गोडी महत्व संतांच्या श्रीमुखातुन सर्वसामान्य भाविकांना त्यांनी पटवुन दिलेले आहे. जीवनाच सार्थक करणारी व सर्वसामान्यांना पेलवणारी अशी ही सोपी आणि सरळ वारी साधना आहे ” या रे या रे लहान थोर I या तिभलते नारी नरI करावा विचार न लगे चिंता कवणाशी| वारी म्हणजे परामार्थात भक्ती क्षेत्रात जेवढी काही पारमार्थिक फल आहेत. ती सर्वचि सर्व फल एका वारी साधना केल्याने वारकऱ्यांना सहज मिळतात. सर्व आवतारांची रासी I तो हा ऊभा विटेवरी I यथोनिअवतार मत्स कुर्मादी शुकर ! सर्व अवतारांची रास असलेला षङ्गुणैश्वर्य संपन्न श्रीभगवान विठ्ठल परमात्मा त्या ठिकाणी (पंढरपूरक्षेत्री भुवैकुंठ ) कटीकर ठेऊन भक्तांची वाट पहात उभा आहे. भक्तांचा अग्रगन्य भक्तराज श्री भक्त पुंडलीकराय पण तेथेच वास्तव्याला आहेत. जीवाला पावन करणार तिर्थ राज ! पुंण्य सलीला चंद्रभागा आहे. सकळीकडे हरिनामाचा गजर ! कथा, कीर्तन जयघोष निनादत आहे. थोडक्यात जीवाला पावन करणारी सर्वच्या सर्व गोष्टी एका वारी साधने मध्ये सामावलेल आहे. म्हणून थोडक्यात वारी साधना वेदप्रणीत वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ माणली गेली आहे. अशी भावना आप्पाबुवा महाराज खान्देशकर यांनी व्यक्त केली.

पालखी सोहळ्यास मोठा बंदोबस्त तैनात

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थान निमित्त वारकरी भाविक नागरिक ग्रामस्थ मंदिर व परिसर या ठिकाणी सुरक्षिततेच्या साठी प्रभावी पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आषाढी पाइ वारीकरिता मोठा फौज फाटा देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रात तैनात करण्यात आला आहे. या मध्ये नियोजन करताना वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था तसेच गुन्हेगारी नियंत्रणा करिता आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत. भाविकांची सुरक्षितता हेच प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस तैनात केला आहे. आयुक्तालयाच्या माध्यमातून एक पोलिस आयुक्त, एक अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपआयुक्त, ११ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६१ पोलीस निरीक्षक, १७२ सपोनि, पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ७३४ पोलीस अंमलदार, ८०० होमगार्ड, तीन एस आर पी एफ कंपनी एवढा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय पोलीस मित्र देखील सहकार्य करीत आहेत. अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.

आरोग्य उपसंचालकांतर्फे आळंदीत आरोग्य सेवेची पाहणी 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळा जून २०२५ आळंदीत लाखो वारकरी भाविक दाखल झाले असून वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य सेवा कार्यरत झाली आहे. आरोग्य सेवेच्या कामकाजाची पाहणी करण्यास आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचेसह अधिकारी, कर्मचारी, सेवक उपस्थित होते.

श्री श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदी मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेत सोहळ्याची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा वारकरी सेवा महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button