इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा केंद्र सरकारसह भारतीय लष्कराला पाठिंबा
१४ लाखांहून अधिक सदस्य आणि विद्यार्थ्यांना सशस्त्र दल आणि राष्ट्रासोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन

दिल्ली.पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या सध्याच्या मोहिमेसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराला पाठिंबा दिला आहे. १४ लाखांहून अधिक सदस्य आणि विद्यार्थ्यांनी सशस्त्र दल आणि राष्ट्रासोबत एकता दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, १९४९ अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली जगातील सर्वात मोठी लेखा संस्था आहे.
पाच रिजनल कौन्सिलसह (प्रादेशिक परिषद) भारतातील १७७ तसेच ४७ देशांमधील ५२ परदेशी शाखा आणि ३३ प्रतिनिधी कार्यालयांमध्ये मिळून ४० हजारहून अधिक सदस्य असे मोठे नेटवर्क असलेली आयसीएआय ही मानवतावादी प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी अद्वितीयपणे स्थानावर आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या या काळात ही संस्था राष्ट्रीय एकता प्रति आपली दृढ वचनबद्धता पुन्हा व्यक्त करते. तसेच देश आणि त्याच्या लोकांना पाठिंबा देण्यास तयार आहे.
भारतातील जवळजवळ १७,००० पिन कोडमध्ये आयसीएआयचे व्यापक अस्तित्व आहे. ज्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या १३ हून अधिक शाखांचा समावेश आहे. या सीमावर्ती प्रदेशांमधील चार्टर्ड अकाउंटंट स्थानिक समुदाय (कम्युनिटी) आणि अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी सक्रियपणे त्यांचा वेळ, कौशल्य आणि संसाधने देऊन प्रतीकात्मक समर्थनाच्या पलीकडे जाण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. आयसीएआयच्या मजबूत स्थानिक नेटवर्कद्वारे, सदस्य आणि विद्यार्थी स्वयंसेवक गरजूंना वेळेवर आणि प्रभावी मदत पोहोचविण्यासाठी सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि मदत संस्थांशी सहयोग करू शकतात.
मदतकार्य सुलभ करण्यासाठी आयसीएआय स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. स्थलांतर, विस्थापित नागरिकांसाठी निवारा छावण्या उभारणे, रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणे आणि आवश्यक औषधे वाटणे. ते रक्तदान शिबिरे आणि इतर महत्त्वाच्या मदत सेवा देखील आयोजित करू शकतात. याव्यतिरिक्त, आयसीएआय बांधवांना सतर्क राहण्याचे, कोणत्याही संशयास्पद किंवा देशविरोधी कारवायांची तक्रार करण्याचे आणि या कठीण काळात राष्ट्रीय सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले जाते.
सीए. आयसीएआयचे अध्यक्ष चरणजोत सिंग नंदा यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या वीर प्रयत्नांचे कौतुक केले आणि देशभरातील संपूर्ण सीए बांधवांना आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे राहण्याचे स्पष्ट आवाहन केले. आयसीएआयचे १४ लाखांहून अधिक आर्थिक सैनिक केवळ शब्दांतच नव्हे तर अर्थपूर्ण कृतीतही वचनबद्ध आहेत, यावर त्यांनी भर दिला.
सीए कम्युनिटीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “आयसीएआय आपल्या सैनिकांच्या धाडसाला आणि दृढनिश्चयाला सलाम करते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप जीव गमावलेल्या दुःखद घटनेचा बदला घेण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा नवीन भारताचा एक शक्तिशाली संदेश आहे, जो भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे प्रतिपादन करतो. आयसीएआय नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या तत्त्वाचे पालन करत आला आहे. आपल्या देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रत्येक वादळात, आपण आपल्या मातृभूमीला आधारस्तंभ म्हणून मजबूतपणे उभे राहिलो आहोत,”.
सर्व आयसीएआय सदस्य आणि विद्यार्थ्यांना या प्रसंगी जागृत, सतर्क राहण्याचे आणि देशाची अखंडता आणि सुरक्षितता जपून सेवेच्या सर्वोच्च आदर्शांचे समर्थन करण्याचे आवाहन अध्यक्षांनी यावेळी केले.
“या कठीण काळात आपण एकत्र येऊया. सीए कम्युनिटीने उदाहरण देऊन नेतृत्व करावे, हे सिद्ध करावे की आपण केवळ आर्थिक रक्षकच नाही तर आपल्या राष्ट्रासाठी शक्ती, करुणा आणि लवचिकतेचे आधारस्तंभ देखील आहोत,” असे ते पुढे म्हणाले.