धर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

माऊलींचे साहित्य सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य करायचेय :- चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा 

आळंदीत कृतज्ञता सोहळ्यात अन्नप्रसाददाते विजय जगताप यांचा सन्मान    

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या महाउत्सवातील ऊर्जा चैतन्य हे अधिक मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाले. माऊलींचे अस्तित्व या उत्सवात होते. यातून सर्वाना माऊलींचा आशीर्वाद मिळाला. महाराष्ट्र परिसरात तसेच माऊलींचे साहित्य सर्व दूर पोहोचविण्याचे कार्य करायचे असल्याचे लोंढे महाराज यांनी सांगितले.

आळंदी ग्रामस्थ आणि आळंदी देवस्थान यांचे वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीरबुवा मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानाहून बोलत होते. या प्रसंगी मुख्याधिकारी माधव खांडेकर, मुख्य अन्नदाते विजय जगताप, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ साहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, बबनराव कुऱ्हाडे पा., सुरेश वडगावकर, माजी विरोधी पक्षगटनेते डी.डी.भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पा. विलास घुंडरे पा., वासुदेव घुंडरे, रामदास भोसले, सागर भोसले, प्रशांत कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, प्रकाश कुऱ्हाडे, आनंद मुंगसे, विष्णू वाघमारे, रमेश गोगावले, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील, शहराध्यक्ष राहुल चव्हाण, किरण येळवंडे, नंदकुमार वडगावकर, सचिन घुंडरे, आळंदी देवस्थान व्यवस्थापक माउली वीर, रवींद्र जाधव, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, शाखा प्रमुख रोहिदास कदम, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, भजन सम्राट कल्याण गायकवाड, स्वकाम सेवा मंडळ अध्यक्ष सुनील तापकीर, सप्ताह काळात सेवारत सेवक, साधक आळंदीकर ग्रामस्थ, युवक तरुण सेवाभावी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थांचे विश्वस्त कबीरबुवा लोंढे महाराज म्हणाले, श्रींचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोज्जीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आळंदी ग्रामस्थ आणि पदाधिकारी, वारकरी भाविक यांनी उत्साही सेवा रुजू केली. या सेवेचा आनंद वाटतो. सोहळ्यातील या उत्सवात आठही दिवस मंत्र मुग्ध करणारे मंगलमय धार्मिक भारावलेले वातावरण वातावरण होते. इतरत्र मोठे उत्सव झाले. मात्र आळंदीत झालेल्या उत्सवातील ऊर्जा चैतन्य हे अधिक मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाले. माऊलींचे अस्तित्व या उत्सवात होते. यातून सर्वाना माऊलींचा आशीर्वाद मिळाला. महाराष्ट्र परिसरात माऊलींचे साहित्य सर्व दूर पोहोचविण्याचे कार्य करायचे असल्याचे लोंढे महाराज यांनी सांगितले. संस्कृतीचा वारसा बरोबर घेऊन पुढील काळात उपक्रम राबविले जातील. असेच सहकार्य माऊलींचे सेवेत कायम स्वरुपी मिळत रहावे असे आवाहन लोंढे महाराज यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, नंदकुमार कुऱ्हाडे, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष संजय महाराज घुंडरे पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली.

या कृतज्ञता सोहळ्यात प्रथम दिनी आणि काल्याचे दिनी अन्नदान सेवा देणारे देणगीदार व वस्तुरूपी सेवा देणगीदार तसेच सोहळ्याचे काळात स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, विद्युत रोषणाई, श्रमदान, बंदोबस्त, पोलीस मित्र सेवा, अन्नदान वाटप करणारे सेवक साधक, युवक तरुण आळंदीकर, प्रशासकीय सेवा देणार्या मान्यवरांचा आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्याचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव निमित्त देवस्थान व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात साजरा झाला. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटी व आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन हरिनाम गजरात करण्यात आले होते. या सोहळ्यास वस्तू रुपी तसेच देणगी स्वरूपात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्व संबंधित नागरिक, पदाधिकारी, भाविक ग्रामस्थांचा कृतज्ञता सन्मान सोहळा यशस्वी पार पडला. यात आळंदी नगरपरिषद आधिकारी, कर्मचारी,आळंदी पोलीस स्टेशन यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजना बद्द्ल त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था रामभाऊ महाराज राऊत यांचे संस्थेतील साधक विद्यार्थी, आळंदीकर ग्रामस्थ मंडळ, स्वकाम सेवा ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पिंपरी चिंचवड सेवेकरी, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सेवारत कार्यकर्ते यांचा कृतज्ञता सोहळ्यात सन्मान सत्कार उत्साहात करण्यात आला.पसायदानाने कृतज्ञता सोहळ्याची सांगता झाली. यावेळी स्नेहभोजन महाप्रसाद वाटप आळंदी ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button