
पुणे. संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले असून नुकत्याच घडलेली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील दुर्घटना यामुळे झालेल्या तनिष्का भिसे या महिलेचा दुदैवी मृत्यु झाला त्याला जबाबदार दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व्यवस्थापन यांनी अवास्तव १० लाख रुपयाची अनामत रक्कम मागीतल्यामुळे रुग्णाच्या तेवढी रक्कम नसल्यामुळे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांनी उपचार नाकारल्यामुळे तनिष्का भिसे यांचा मृत्यु अति रक्तश्राव झाल्याने तातडीचा उपचार न दिल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. या अशा अनेक घटना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जास्त डिपॉजीट मागितल्यामुळे तसेच तातडीची रुग्णसेवा न दिल्यामुळे रुग्णाची गैरसोय होते तसेच महाराष्ट्रातील व पुणे शहारातील सर्व धर्मादाय येणाऱ्या हॉस्पिटल मध्ये धर्मादाय अंतर्गत येणारा मोफत उपचार नाकारल्याने वारंवार अशा दुर्देवी घटना घडल्या जात आहेत. या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेतर्फे पत्रकार परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे,महा.राज्य संघटक रमेश क्षिरसागर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक आघाडी राज रजपुत,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनिल पवार,महाराष्ट्र राज्य संघटक रमेश क्षिरसागर पत्रकार परिषदेस उपस्थित होते
प्रशासनावर धर्मादाय कार्यालयाची जरब नसल्यामुळे अशा दुर्देवी घटनांना जबाबदार धर्मादाय सह आयुक्त कार्यालय देखिल जबाबदार आहे. अशा दुर्देवी घटना टाळण्यासाठी सदर घटनेची चौकशी करून दोर्षीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच धर्मादाय हॉस्पिटलच्या अंर्तगत येणाऱ्या उपचाराचे नियमावली प्रमाणे किती खाटा शिल्लक आहेत तसेच मोफत उपचाराचा लाभ घेण्याचा नामफलक हॉस्पिटल मध्ये लावलेले देखील नसतात व हॉस्पिटल मध्ये जनसंपर्क अधिकारी हे पिडीत रुग्णांना मोफत धर्मादाय अंतर्गत येणारा उपचार देण्यासाठी टाळाटाळ करतात असे दिसुन आले आहे. तसेच ससुन सारख्या शासकीय रुग्णालयात आणखी चांगल्या सुधारणा व्हाव्यात. तसेच लाडकी बहिण योजने सारखीच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना १० लाख रु. आरोग्य विमा मोफत स्वरुपात देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.