संत तुकाराम महाराज पालखी महामार्गास देहूतून भूसंपादनाची मागणी
एक लक्ष वारकरी भाविक भक्तांची स्वाक्षरी मोहीम :- सुहास गोलांडे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील पालखी मार्गांचे डांबरीकरण, रुंदीकरण कामे मोठ्या प्रमाणात होत असताना देहूगाव ते देहूरोड या सुमारे ५ किलोमीटर पालखी महामार्गाकडे राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे ,पडले आहेत ,साईट पट्टे गायब झाले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण करण्यासह बाधितांचा नुकसान भरपाई मोबदला देण्याचे मागणीस राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १८ ते १९ जून या दोन दिवसांचे कालावधीत एक लाख वारकरी भक्तांच्या स्वाक्षरी घेण्यात येणार आहेत. या मोहिमेत सह्या घेऊन राज्य व केंद्र सरकारला निवेदन देणार असल्याचे पंचयती समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी सांगितले.
देहू गावातील विविध नागरी सेवा सुविधा, समस्यां सांगताना ते म्हणाले, देहूगाव विठ्ठलनगर येथील सर्व्हे न.९७ मधील जागा महावितरण अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यासाठी मिळावी. या बाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी ४ जून २०२५ रोजी पत्रव्यवहार केला आहे. देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे , प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत, कर्मचारी यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पाणी योजनेसाठी निधी उपलब्द करून देण्याची हि त्यांनी मागणी केली. देहू येथील समस्यां मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असून शासनाने तात्काळ दाखल घेण्याची गरज आहे. असे त्यांनी सांगितले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही ८ ऑगस्ट २०२३, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २९ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र देहू मुख्य कमान ते सीओडी डेपो ते देहूरोड जुना मुंबई पुणे हायवे पर्यंतचा रस्ता नूतनीकरण, आणि तत्पूर्वी या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करून वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यातील प्रवास खड्डेमुक्त व्हावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. मात्र अजून पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. यासाठी केवळ आश्वासने दिली जात आहेत. कोणतेही काम केले नाही ,देहूत होणाऱ्या तीन यात्रे साठी लाखो वारकरी भाविक भक्त येत असतात. मात्र वारकरी भाविक भक्तांचे सेवा सुविधां कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. देहूतील पाणी प्रश्न, विद्युत पुरवठा अंतर्गत व बाह्य रस्ते इतर समस्यां सोडविण्यासाठी तसेच देहूगाव ते देहूरोड या पाच किलो मीटर लांबीच्या पालखी मार्गाचे रुंदीकरण ,डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. या मागण्या कडे लक्ष वेधण्यासाठी येत्या संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान दिनी व दुसऱ्या दिवशी १८ व १९ जून रोजी एक लक्ष वारकरी भाविक भक्तांच्या सह्या घेण्याची मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागण्यांचे निवेदन तयार करून राज्य व केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात येईल असे सुहास गोलांडे यांनी सांगितले.