अलंकापुरी भाविकांचे स्वागतास सज्ज ; भाविकांसाठी सेवा सुविधांना प्राधान्य
आळंदीतून १९ जून ला माऊलींचे पालखी सोहळ्याचे रात्री उशिरा प्रस्थान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पायी वारी साठी आळंदी मंदिरातून १९ जून रोजी रात्री उशिरा तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू मंदिरातून १८ जून रोजी लाखो भाविक, वारकरी, नागरिकांचे उपस्थितीत प्रस्थान हरिनाम गजरात होणार आहे. यासाठी देहू आणि आळंदी नगरपरिषदेने भाविकांना सेवा सुविधा देण्यास कंबर कसली आहे. प्रशासन भाविक नागरिकांचे स्वागतास सज्ज झाल्याचे शहरातून फेरफटका घेतल्यास दिसते. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आळंदी प्रस्थान सोहळ्याचे अनुषंगाने केलेल्या तयारीचे कामाची पाहणी करून संबंधितांना सूचना देत मार्गदर्शन केले. आळंदी देहू परिसर विकास समितीचे प्रमुख कार्याध्यक्ष डॉ. विशवनाथ कराड यांचे हस्ते इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली.
सुरक्षित, आरोग्यदायी वारी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आळंदी आणि देहू मध्ये पालखी सोहळ्यात भाविक, नागरिकांचे आरोग्यासाठी सुसज्ज आणि कार्यरत झाली आहे. या अंतर्गत आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी आरोग्य सेवा मदत केंद्र उभारले आहेत. आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षिका डॉ. उर्मिला शिंदे आणि तालुका वैद्यकीय डॉ. माने, वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे यांचे मार्गदर्शनात आरोग्य मदत सेवा केंद्र आळंदी मंदिरांसह शहरात तैनात करीत सेवारत झाली आहेत.
देहू आळंदीत प्रभावी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदीत मोठ मोठ्या प्रमाणात भाविक, नागरिकांसह तीर्थक्षेत्र देहू आळंदी मंदिर परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहे. आळंदीत पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यरत करण्यात आली असून संपूर्ण आळंदीत ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या माध्यमातून भाविक, नागरिक यांस पालखी सोहळा प्रस्थान काळात सूचना देण्यात येतील. ठीक ठिकाणी असलेल्या चौकात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात आली असून आळंदीतील पोलिस नियंत्रण कक्षातून आळंदी मधील संपूर्ण प्रस्थान सोहळ्यावर सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. यासाठी आळंदी पोलिसांनी प्रभावी उपाय योजना करीत परिश्रम पूर्वक काम केले आहे. यासाठी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, गुप्त वार्ता विभागाचे नाईक मच्छिंद्र शेंडे, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात वरिष्ठांचे सूचना, आदेशा प्रमाणे आळंदीत पोलिस बंदोबस्त लावला आहे. पोलिस प्रशासनास प्रस्थान काळात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खेडचे प्रांत अनिल दौन्डे यांचे मार्गदर्शनात तहसीलदार प्रशांत बेडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडा तसेच पुणेविभागीय आयुक्त यांचे नियंत्रणात भाविक, वारकरी, नागरिक यांस प्रस्थान काळात नागरी सेवा सुविधा देण्यासाठी कंबर कसली असून आळंदी नगरपरिषद, पुणे विभागीय महसूल, खेड महसूल विभागाचे माध्यमातून भाविकांची गैरसोय होणार नाही.यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यासाठी गेल्या महिना भरापासून तयारी केली जात आहे. आरोग्य सेवा, स्वच्छता,पाणी पुरवठा आदी नागरी सुविधा देण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
अखंडित वीज पुरवठ्याची आळंदीत ग्वाही ; देखभाल दुरुस्ती अंतिम टप्प्यात
खेड तालुक्यातील वीज महावितरण केंद्राने आळंदीत गेल्या महिना भरापासून वीज यंत्रणा देखभाल दुरुस्ती केली आहे. प्रस्थांनचे काळात अखंड वीज पुरवठा सुरू राहील अशी ग्वाही दिली असून अचानक तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ वीज वितरण कडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीला दोन ठिकाणा हून वीज पुरवठा कार्यरत ठेवला असल्याने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता विभाग घेईल अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
आळंदीत गुरुवार मुळे रात्री उशिरा होणार प्रस्थान
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा १९ जून रोजी रात्री ८ वा.होणार आहे. दि.२० रोजी आजोळ घरातून पालखी आळंदीतून पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी सोहळ्या निमित्त लागणाऱ्या विविध वस्तू साहित्याची कोठी सजली असून आदी सुई दोर्या पासून मोबाईल चार्जर, वॉकी टॉकी पर्यंतची जमवाजमव करण्यात आली आहे. आळंदी देवस्थानचे भक्त निवासात इमारतीत परंपरेने कोठी सजली आहे. पालखी सोहळ्यात श्रींचे पूजा, आदी साहित्य, वस्तू , श्रींचा रथाला आवश्यक असणारे साहित्य, पदाधिकारी, मानकरी, सेवक, कर्मचारी सुरक्षा रक्षक यांच्या साठी असणारे साहित्य कोठीत ठेवण्यात आले आहे. कोठीची तयारी पूर्ण झाल्याचे श्रीधर सरनाईक यांनी सांगितले. परंपरेने सोहळा आणि देवस्थानच्या प्रथा परंपरांचे पालन करीत व्यवस्थापक, सर्व विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक माऊली वीर यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणात कोठी श्रींचे प्रस्थान सोहळ्याचे नियोजनात सजली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याची कोठी सजली :- श्रीधर सरनाईक
कोठीत आषाढी वारी निमित्ताने विविध साहित्य वस्तूंनी पोत्यात भरले आहे. या मध्ये श्रींच्या अभिषेक पूजेसाठी, नैवेद्यासाठी आवश्यक साहित्य वस्तू ,देवस्थान कार्यालयीन साहित्य वस्तूंचा समावेश आहे. निवास व्यवस्था,भोजन व्यवस्थेस आवश्यक साहित्य, तंबू आदी साहित्याचा समावेश आहे. या शिवाय
पालखी सोहळ्यात स्वयंपाकाची भांडी, किराणा माल, ताडपत्री, रेनकोट,अब्दागिरी, शाली, पालखी वरील छत्र्या, नगरखाना ,स्टेशनरी साहित्य, दानपेट्या, पाट, चौरंग, दिवे,बॅटऱ्या,मंडपाचे साहित्य, गाद्या, उश्या ,बेडशीट, कचरा साठवण बिन, प्रभावळ, पत्रावळ, बैलजोडीस आवश्यक साहित्य, फलक, श्रींच्या चांदीचे साहित्य आहे. पालखी सोहळ्याचे प्रथा परंपरांचे पालन करीत मानक-यांची पागोटी देखील संकलित करण्यात आली आहे. नोंदवह्या, यात श्रींच्या रथाची उंची १३ फूट, लांबी १४ फूट,रुंदी ६ फूट , मधील भाग १२ फूट, रथाच्या आतील बाजू ५ फूट अशा अनेक नोंदी घेण्यात आल्या आहेत.
आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारीचा प्रवासातील किलो मीटर देखील नोंदीत आहे. आळंदी ते पुणे २९ कि. मी., पुणे ते सासवड ३२ कि. मी., सासवड ते जेजुरी १६ कि. मी., जेजुरी ते वाल्हे १३ कि. मी., वाल्हे ते लोणंद २० कि. मी., लोणंद ते तरडगाव ८ कि. मी., तरडगाव ते फलटण २१ कि. मी., फलटण ते बरड १८कि. मी.,बरड ते नातेपुते २१ कि. मी., नातेपुते ते माळशिरस,१८ कि. मी., माळशिरस ते वेळापूर १९कि. मी., वेळापूर ते भंडीशेगाव २१कि. मी., भंडीशेगाव ते वाखरी १० कि. मी., वाखरी ते पंढरपूर ९ कि. मी.,आळंदी ते पंढरपूर २५५ कि. मी. असल्याचे ठेखील कोठीचे जमवाजमव नोंदीत दखल घेण्यात आली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी प्रस्थान दिनी पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती, भाविकांच्या महापूजा असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने होतील. श्रींच्या चल पादूकांवर पुजा, भाविकांना श्रींचे समाधीचे दर्शन होईल. दरम्यान कीर्तन सेवा होईल. त्यानंतर श्रींचा गाभारा स्वच्छता केला जाईल. यात समाधी वर जलाभिषेक, श्रींचा महानैवेद्य होऊन पुन्हा भाविकांना श्रींचे गाभाऱ्यातून दर्शन व्यवस्था खुली राहील.
श्रींचे प्रस्थान सोहळ्या पूर्वी मंदिरात गुरुवार काढल्यानंतर सोहळ्यातील निमंत्रित दिंड्याचा प्रवेश हरिनाम गजरात सुरु होईल. यात रथा पुढील आणि मागील अशा ४७ दिंड्यांना मंदिरात प्रत्येक दिंडीतील ९० वारकरी भाविकांनाच मंदीरात प्रवेश दिला जाणारआहे. यावर्षी मंदिरातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच चेंगरा चेंगरी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. सोहळ्याचे प्रस्थानचे उपक्रमात गुरवार असल्याने तो काढल्या नंतर दिंड्यांचा प्रवेश मंदिरात होईल. श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने आणि आळंदी देवस्थान च्या वतीने श्रींची आरती होऊन प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप होईल. वीणा मंडपात व्यापारी तरुण मंडळ आणि माऊली ग्रुप ने फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या पादुकां वेदमंत्र जयघोषात प्राणप्रतिष्ठापणा होईल.
दरम्यान देवस्थान च्या वतीने प्रमुख मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने देखील दिंडी प्रमुख, प्रतिष्ठीत मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप होईल. दरम्यान परंपरेचे कार्यक्रम झाल्यानंतर आळंदी ग्रामस्थ युवक तरुण माऊली माऊली जयघोषात पालखी खांद्यावर घेऊन श्रींचे पालखीचे विना मंडपातून रात्री उशिरा गुरुवारी ( दि. १९ ) प्रस्थान होईल. पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान झाल्यानंतर श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा त्यांत महाद्वारातून श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा करीत पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी अर्थात जुन्या गांधी वाड्याचे विकसित दर्शनबारीत समाज आरतीने सोहळा एक दिवसा साठी विसावेल. शुक्रवारी ( दि. २० ) श्रींचे पालखीचा आजोळघरातील पाहुणचार होऊन पुण्यनगरीकडे सोहळा भल्या पहाटे हरिनाम गजरात मार्गस्थ होईल.
आळंदीत भाविक नागरिकांची सुरक्षितता जपत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे माध्यमातून आळंदी आणि देहूत देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मध्ये देहू सह आळंदी आणि प्रस्थान मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात झाला आहे.
आळंदी प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ; घरी राहून अनुभूती
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी चे वतीने माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भाविक, नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्द्ध करून देण्यात आली असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
आळंदी प्रस्थान सोहळ्यावर सीसीटीव्हि ची करडी नजर
आळंदीत झालेले सोहळ्याचे नियोजना प्रमाणे तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाविकांचे स्वागतास अलंकापुरी तील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात आळंदी नगरपरिषद, देवस्थान, पोलीस, महसूल, आरोग्य सेवा, पाणी आणि वीज पुरठा यंत्रांना देखील सज्ज झाली आहे. आळंदी यात्रेवर सीसीटीव्हि ची करडी नजर तैनात असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. यात्रा काळात भाविक, नागरी आणि मंदिर परिसर सुरक्षितता आणि स्वच्छता यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. आळंदी पंचक्रोशीतील वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करून यंत्रणा सुसज्ज करण्यात आली असून अधिकचे कामगार देखील कामावर बोलाविण्यात आले आहेत. वीज पुरवठा खंडीत होणार नाही. याची दक्षता घेतली जात आहे.
माऊलींचे मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम सुरु असून भाविक, नागरिकांची गर्दी होत आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. परिसरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन सेवा सुरु असून आळंदीत भाविकांचे भक्तीला उधाण आलेच सर्वत्र दिसत आहे. इंद्रायणी काठी अनेक ठिकाणी भाविकांनी परंपरेने राहुट्या टाकून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती लोकशिक्षणपर कार्यक्रमास हरिनाम गजरात सुरुवात झाली. भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आळंदी प्रस्थान सोहळ्याचे अनुषंगाने केलेल्या तयारीचे कामाची पाहणी करून संबंधितांना सूचना देत मार्गदर्शन केले.
भाविकांचे आरोग्य सेवेस आळंदी ग्रामीण रुग्णालय सज्ज
आळंदीत राज्यातून पालखी सोहळ्यास आलेल्या भाविक वारकऱयांचे आरोग्य सेवेसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले असून वारकऱ्यांच्या आरोग्यदायी सेवा सुविधां सोहळ्याचे प्रस्थान सोहळयाचे कालावधीत १५ ते २० जून या कालावधीत देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयात आंतररुग्ण व बाह्य रुग्ण दोन विभाग दोन सत्रांत २४ तास सलग सुरू राहणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य सेवेचे नियंत्रण आणि मार्गदर्शनात आरोग्य सेवा भाविकांचे सुरक्षिततेसाठी सज्ज झाली आहे.
प्रस्थान यात्रा कालावधीत जादा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,औषध निर्माण अधिकारी, आंतरवासिय विद्यार्थी, क्ष-किरण तंत्रज्ञ, रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येत आहेत. शहरात ठीक ठिकाणी यात्रेस आरोग्य सेवा केंद्र उभारणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, परिचर,( वर्ग ४ ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, अंतरवासिय विद्यार्थी, क्ष-किरण तंत्रज्ञ, लहान व मोठ्या रुग्णवाहिका उपलब्ध रहाणार आहेत. बाह्यरुग्ण विभाग चाकण चौक ,दर्शन बारी, वडगाव रोड,( गणेश मंदिर) माऊली मंदिर, इंद्रायणी घाट परिसर आदी ठिकाणी सेवा केंद्र बुथची उभारणी करण्यात आली असून आरोग्य सेवा सुरु झाली आहे.
आरोग्यदायी सेवा वारकरी,भाविकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विनामूल्य देण्यात येत आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी कर्मचारी,आरोग्य सेवक परिश्रम घेत आहेत.