आलंदीब्रेकिंग न्यूज़मराठी

वीज ग्राहकांना बिले वेळेत मिळतील यांची दक्षता घेणार : वीज अभियंता राजेंद्र गोरे 

आळंदीत वीज ग्राहकांना बिले उशिराने आर्थिक भुर्दंड 

Spread the love

वीज मीटर रीडिंग शिवाय बिले वीज ग्राहक त्रस्त 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदी पंचक्रोशीतील वीज ग्राहकांचे वीज मीटर रीडिंग विलंबाने घेतले जाते, बिले उशिरा मिळतात. यामुळे वीज ग्राहकांच्या आळंदी परिसरातील वाढत्या तक्रारींची तात्काळ दाखल घेऊन यापुढील काळात वीज बिले आणि वीज मीटर रीडिंग वेळेत करण्याचे सूचनादेश संबंधित अभिकर्ता यांना देण्यात आले आहेत. या पुढील काळात वीज ग्राहकांना बिले वेळेत मिळतील यांची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही चाकण वीज महावितरणचे वीज अभियंता राजेंद्र गोरे यांनी दिली.

आळंदीतील वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी येथील सामाजिक कार्यकर्ते राजे ग्रुप चे प्रमुख विजय अप्पा पगडे यांनी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर यांना सांगितले. या वर तात्काळ आळंदी येथील वीज महावितरणचे अधिकारी संदीप पाटील यांचे कडे संवाद साधत नियमित वेळेत वीज बिले आणि वीज मीटर रीडिंग घेण्याची मागणी करीत संवाद साधला. त्यांनी हि संबंधित एजंसीचे कर्मचारी यांना तात्काळ सूचना दिल्या. आळंदीतील सेवा सुविधा केंद्रात संगणक देखभाल दुरुस्ती आवश्यक असून विलंबाने काम होत असल्याने वीज महावितरण कार्यालया बाहेर ग्राहकांचे रांगा लागतात. तसेच वेळोवेळी इत्तर कामे सोडून कार्यालयात नाहक यावे लागते. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागत असल्याने वीज ग्राहकांतून नाराजी वाढत आहे.

चाकण महावितरण कार्यालयात वीज अभियंता राजेंद्र गोरे यांना साकडे

दरम्यान सायंकाळी चाकण येथील वीज महावितरणचे कार्यालयात अभियंता राजेंद्र गोरे यांची आळंदीतुन आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल चव्हाण, शाखा प्रमुख रोहिदास तापकीर, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी अभियंता राजेंद्र गोरे यांना निवेदन देऊन भेट घेत आळंदीतील समस्यांची माहिती देत संवाद साधला.

आळंदीतील ग्राहकांना वीज बिल भरणा दिनांक मुदत संपल्यावर बिले मिळतात. सवलतीचा लाभ मिळत नाही. मागणी केल्यावर विलंबाने बिले येतात. वेळेत बिले वाटप होत नसल्याने ग्राहकांना सवलत न मिळता उलट भुर्दंड भरावा लागतो. तसेच वेळेत वीज बिलासाठी मीटर रिडिंग घेतले जात नाही. अंदाजे रीडिंग ची बिले वाटप केली जातात. आणि ती ही विलंबाने वाटप होत असल्याने नाहक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. आर्थिक नुकसान होते. वेळेची आणि पैशाचे देखील नुकसान होत असल्याचे विजय अप्पा पगडे यांनी आळंदी वीज महावितरणचे कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांना सांगत येथील तक्रारींचा पाढा वाचला. या अनुषंगाने वेळेत मीटर रिडिंग घेणे, बिले वेळेवर वाटप व्हावे, अंदाजे बिले वाटप होऊ नये, ग्राहकांचे हिताचे तसेच महावितरण कंपनीचे नाव लौकिकात वाढ व्हावी. यासाठी ग्राहकाभिमुख कामकाज व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर यांनी अधिकारी वर्गाकडे केली.

वीज ग्राहक वीज वापर युनिट स्लॅबचे लाभा पासून वंचित ; अंदाजे बिले

राहुल चव्हाण यांनी निवेदन देऊन ग्राहकांना वीज वापर युनिट स्लॅब चा लाभ मिळत नाही. यामुळे ग्राहकांना वीज वापर न करता आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. ग्राहकांना आपल्या कार्यालयातील संगणक बिघाड मुळे बिले ही कार्यालयात येऊन देखील विलंबाने मिळत आहेत. तत्काळ प्रशासकीय कामकाज व्हावे होऊन ग्राहकांचे सर्व अडचणी आळंदीतच दूर व्हाव्यात अशी मागणी केली.

आळंदी पंचक्रोशीत वीज बिले विलंबाने वाटप ; ग्राहकांना आर्थिक भुर्दंडहोत आहे. अंदाजे वीज मीटर रिडिंग ने ग्राहकांची लूट तात्काळ थांबविण्याची मागणी वीज मीटर रिडिंग आणि वीज बिले विलंबाने वाटप होत असल्याने वीज ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यातून वीज ग्राहकांना अन्याय सहन करावा लागत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, वीजबिल वाटपाची प्रक्रिया वेळेवर व नियमित व्हावी, रीडिंग घेण्याची प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध असावी, चुकीच्या बिलांच्या तक्रारींसाठी आळंदीत कायम स्वरूपी उपाय योजना कार्यरत राहावी. अनेकांना वेळेवर बिल मिळत नसल्याने उशीराची दंडात्मक रक्कम भरावी लागते, तर काहींना चुकीच्या रीडिंगमुळे हजारो रुपयांची अवास्तव बिले भरावी लागत आहेत. महावितरणने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा या मागणी साठी सनदशीर मार्गाने शिवसेने तर्फे आंदोलन छेडले जाईल असा खणखणीत इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button